क्रिडा व मनोरंजन

महामाता रमाई महोत्सवात रंगला बण्डा जोशी यांचा हास्यपंचमी कार्यक्रम

हास्यातून मिळते ताणतणावातून मुक्ती : भारत सासणे

0 0 1 8 1 2

पुणे : सध्याचा भोवताल पाहता माणसाला जगणे सुसह्य होण्यासाठी आनंदी राहणे गरजचे आहे. हसण्यामुळे, आनंदी राहण्यामुळे समस्यांकडे बघण्याचा निर्मळ दृष्टीकोन प्राप्त होतो. आनंद, हास्य आपल्याला ताणतणावातून मुक्त करते, असे मत ज्येष्ठ कथाकार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी केले.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महामाता रमाई महोत्सवात आज (दि. ४) ज्येष्ठ एकपात्री कलावंत बण्डा जोशी यांचा ‘हास्यपंचमी’ हा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला होते. या कार्यक्रमात जोशी यांचा ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला आला. त्या वेळी सासणे बोलत होते. रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष सचिन ईटकर, महोत्सवाचे संयोजक विठ्ठल गायकवाड, लता राजगुरू मंचावर होते.

सासणे पुढे म्हणाले, सध्याच्या तणावग्रस्त परिस्थिती पाहता बंडा जोशी यांच्या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित होते. रमाई महोत्सवात हास्यपंचमी कार्यक्रमाचे आयोजन आणि त्यांचा सत्कार उचीत आहे.

पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्या प्रमाणे, ‘जिथे एक कलावंत बोलत असतो आणि लोक खळखळून हसत असतात, ते जगातलं सगळ्यात सुंदर दृश्य असतं’ याची प्रचिती बण्डा जोशी यांच्या कार्यक्रमातून पुणेकरांनी या वेळी आली. दैनंदिन प्रपंच, व्यवहार आणि सार्वजनिक जीवनातील विविध प्रसंगातील विनोदांची अतिशय अप्रतिम मांडणी त्यांनी केली. सत्काराला उत्तर देताना बण्डा जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सचिन ईटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी महोत्सवाविषयी आणि कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले. फोटो ओळ :  महामाता रमाई महोत्सवातील सत्कार सोहळ्यात (डावीकडून) विठ्ठल गायकवाड, सचिन ईटकर, भारत सासणे, बण्डा जोशी, ॲड. प्रमोद आडकर, लता राजगुरू.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 1 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे