१३६ वर्ष पूर्ण केलेली जिल्हा परिषद प्रशाला तुळजापूर , दुर्लक्षामुळे परिसराची दुर्दशा
शाळेचे माजी विद्यार्थी अवस्था पाहून झाले संवेदनशील

निजाम राजवटीमध्ये चालवली गेलेली जिल्हा परिषद प्रशाला तुळजापूर सुमारे 100 वर्ष दिमाखत चालली परंतु आज प्रशालीची अवस्था मरणयातना भोगत असल्यासारखी दिसून येत आहे. प्रशासनाने आणि शहरवासीयांनी थोडीशी संवेदनशीलता दाखवली तर ही प्राचीन प्रशाला पुन्हा एकदा दिमागदार होईल असा विश्वास माजी विद्यार्थ्यांना आहे.
प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी च्या निमित्ताने या प्रशालेमध्ये माजी विद्यार्थ्यांनी भेट दिली असता प्रशालेच्या बाहेरच्या परिसरामध्ये झालेली दुर्गंधी आणि दुरावस्था दिसून आली. 1990 पर्यंत या ठिकाणी पहिली ते दहावी आणि अकरावी बारावीचे वर्ग देखील चालविले जात होते. अकरावी बारावीचे विज्ञान शाखा या ठिकाणी चालवली जात होती परंतु शिक्षणाचे खाजगीकरण झाल्यानंतर खाजगी संस्था वाढल्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा अडचणीत आल्या. आज या प्रशालेमध्ये केवळ शंभर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रशालेच्या सेविका प्रवरा प्रकाश हंगरगेकर यांनी प्रशालेच्या प्रति आपल्या भावना व्यक्त करताना डोळ्यांमधून पाणी काढले.
आपले पती केल्याचे दुःख मी सहन केले परंतु शाळेपासून दूर झाले. शाळेवर आलेल्या अनेक अडचणी सोडविण्याचे प्रयत्न केला, शाळेची स्वच्छता आणि सुरक्षितता यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. 26 वर्षाच्या सेवेमध्ये कधीही रजा न घेता शाळेपासून दूर झाले नाही. आजही वाटते की, प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमधून शाळा पुन्हा एकदा पूर्वीचे वैभव प्राप्त करून चालू राहील, याच अपेक्षेने जगते आहे.


